या गावात राहत नाही एक सुद्धा पुरुष तरीही या गावातील महिला होतात गरोदर….जाणून घ्या आश्चर्यकारक असे सत्य आपण सुद्धा हैराण व्हाल.

आपल्याला माहित आहे की या जगात अनेक प्रकारच्या जमाती आहेत. यापैकी काही जमाती जंगलात राहतात तर काही खडकाळ भागात राहतात पण या जमातीतील लोकांमध्येही अनेक विचित्र परंपरा आहेत, ज्यामुळे सामान्य लोक जाणून आश्चर्यचकित होतात.
आज आम्ही आपल्याला ज्या कुळाबद्दल किंवा जमातीबद्दल सांगणार आहोत ती जमात खूपच विचित्र आहे. या जमातीमध्ये एकही पुरुष राहत नाही या जमतीतील लोकांमध्ये फक्त महिलांचा समावेश आहे.
या संपूर्ण गावात सुमारे अडीच हजार महिला आहेत. तसेच, या गावात पुरुषांच्या प्रवेशाला सुद्धा बंदी आहे. पण सर्वात आश्यर्यची गोष्ट म्हणजे तरीही या गावातील महिला गर्भवती होतात. अखेर हे गाव कसे आहे आणि संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया.
केनियामधील उमोजा गावाची बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. या खेडेगावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एक सुद्धा पुरुष राहत नाही. या गावात फक्त महिलाच राहतात.
१९९० मध्ये या खेड्याची स्थापना १५ स्त्रियांनी केली होती, या स्थानिक महिलांवर ब्रिटिश सैनिकांनी बला*त्कार केला होता त्याच त्या स्त्रिया होत्या.
आणि गेल्या 30 वर्षांपासून या गावात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. या गावाच्या सीमेवर अनेक काटेरी तारा आहेत. जर एखाद्याने हे गाव ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला भयानक अशी शिक्षा दिली जाते.
या गावात बला*त्कार, बालविवाह, घरगुती हिंसाचार आणि सुंता, हिंसाचार झालेल्या महिला राहतात. या गावात सध्या सुमारे अडीच हजार महिला आणि सुमारे दोनशे लहान मुलेमुली आहेत.
आता हे जाणून घेणे महत्वाचे आहे की या गावात पुरुष राहत नाहीत तर मग या खेड्यातील महिला गरोदर कशा राहतात? याला उत्तर उमोजा गावच्या शेजारील गावातल्या लोकांनी दिले आहे.
त्या गावातील एका व्यक्तीने सांगितले की या स्त्रियांना असं वाटतं की आपण पुरुषांशिवाय जगू शकतो. पण वास्तविकता अशी आहे की यापैकी बर्याच स्त्रिया त्यांच्याच खेड्यातील पुरुषांच्या प्रेमात पडतात.
यानंतर त्याच्याच गावातील लोक रात्रीच्या अंधारात उमोजा गावी जातात आणि पहाटेच्या आधी परत येतात. या पुरुषांचे एकाच गावात असे सं-बंध आहेत असे नाही तर त्याचे अनेक गावातील स्त्रियांशी सं-बंध आहेत.
येथील स्त्रिया पुरुषांसोबतचे त्यांचे सं-बंध उघडपणे मान्य करत नसल्यामुळे कोणत्या स्त्रीने कोणत्या मनुष्याशी सं-बंध बनविला आहे हे कोणालाही ठाऊक नसते. गर्भनिरोधकाचे कोणतेही साधन नसल्याने स्त्रिया यामुळे गर्भवती होतात.
पण या महिला एकट्या आपल्या मुलांची काळजी घेतात. जर त्यांना मुली असतील तर त्या मुलींना शिकवले जाते आणि स्वत: च्या पायावर उभे केले जाते.
या गावाने पुरुषांच्या प्रवेशावर बंदी घालून बरीच चर्चा निर्माण केली होती. यामुळे बरेच पर्यटकही येथे येतात. या पर्यटकांकडून गावात प्रवेश करण्यासाठी अमाप असे पैसे सुद्धा घेतले जातात.
तसेच या गावातील महिला खास प्रकारचे दागिने बनवतात. त्यामुळे त्यांची विक्री करुन सुद्धा ते पैसे मिळवतात आणि आपल्या मुलांनाही खायला घालतात.
काहीही झाले तरी या खेड्यातील स्त्रियाना हे गाव खूप आवडते. त्या असे म्हणतात की जेव्हा जेव्हा त्याची बाह्य जगाकडून फसवणूक झाली तेव्हा या गावानेच केवळ त्यांना साथ दिली आहे.