जर आपल्याला सुद्धा लघवी करताना जळजळ होत असेल किंवा खाज होत असेल…तर आजचं करा हे उपाय अन्यथा गंभीर परिणांमाना तोंड द्याल…महिलांनी विशेष

आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या दिवसात आता लघवी करताना जळजळ किंवा त्रास होण्याची समस्या जास्त प्रमाणात होते. यूरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे लघवी करताना तुम्हाला जळजळ होऊ शकते. ही समस्या जास्त प्रमाणात महिलांना होते कारण त्यांनाच यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सर्वात जास्त होतं.
ही समस्या या दिवसात जास्त होते कारण या दिवसात लोक कमी पाणी पितात. तुम्हालाही ही समस्या होत असेल तर ५ घरगुती उपायांनी ही समस्या दूर केली जाऊ शकते.
युरिन इन्फेक्शन होण्याची मुख्य कारणं-
मॉर्डन लाईफस्टाईलमुळे आजकाल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा त्रास कॉमन झाला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणं. कारण आजही भारतात तुम्ही प्रवासाला किंवा रोज अगदी नोकरी करायला बाहेर पडल्यासही नाईलाजास्तव तुम्हाला अस्वच्छता असलेल्या पब्लिक टॉयलेटचा वापर करावाच लागतो. पण तरीही या समस्येकडे गंभीरतेने पाहिलं जात नाही.
त्यामुळे अनेकदा महिला या इन्फेक्शनच्या बळी पडतात. तसं पाहता हे तेवढं गंभीर इन्फेक्शन नाही पण जर वेळेवर इलाज न केल्यास याचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे घरातील टॉयलेटची नियमित रूपाने सफाई न केल्यासही तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं.
असं होतं इन्फेक्शन:-
युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन हे इतकं कॉमन आहे की, प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यात एकदा तरी या इन्फेक्शनचा उपचार करून घ्यावा लागतोच. युटीआई तेव्हा होतं जेव्हा बॅक्टेरिया किंवा फंगस आपल्या पचन तंत्रातून निघून किंवा इतर माध्यमातून लघवीच्या मार्गावर चिकटतात आणि वेगाने वाढत जातात.
जर या इन्फेक्शनकडे वेळीच लक्ष न दिल्यास बॅक्टेरिया तुमच्या ब्लॅडर आणि किडनीपर्यंत पोहचू शकतात आणि तुम्हाला इजा होऊ शकते.
लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी नारळाचं पाणी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. तसेच नारळाच्या पाण्याने शरीराला इतरही अनेक फायदे होतात.
नारळाच्या पाण्यात भरपूर गुणकारी तत्त्व असतात. ज्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ, वेदना आणि त्रासाची समस्या दूर करू शकता. ही समस्या डिहायड्रेशनमुळे होते. यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जास्तीत जास्त नारळाचं पाणी प्यावे.
लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी दुसरा सर्वात चांगला उपाय म्हणजे काकडी. काकडीमध्ये असलेल्या एल्कलाइन तत्वाने शरीर आतून थंड राहतं. तसेच याने पचनक्रियाही चांगली राहते.
इतकेच नाही तर यात अनेकप्रकारचे अॅंटीऑक्सिडेंट्सही असतात. त्यामुळे या दिवसात काकडी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे काकडीचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा.
उन्हाळ्यात लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय म्हणजे थंड दूध. थंड दूध प्यायल्याने शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि लघवी करताना होणारी जळजळही दूर होईल. या थंड दुधात तुम्ही वेलची पावडरही मिश्रित करू शकता.
जर तुम्हाला तुम्हाला होणाऱ्या या समस्येपासून सुटका हवी असेल तर या दिवसात भरपूर दही खावे. याने लघवी करताना होणारी जळजळही दूर होते. दह्यामध्ये शरीरातील खराब बॅक्टेरिया नष्ट करण्याची आणि चांगले बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता असते. तसेच याने योनीमध्ये संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियालाही दूर केलं जातं.
लघवी करताना होणारी जळजळ ही समस्या दूर करताना व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. ही समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ आपल्या शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढवून बॅक्टेरियाची वाढ रोखली जाते. याने इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. फळ आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळे लिंबाचा रस, संत्री, कीवी फळ, द्राक्ष आणि आवळा ही फळे खावीत.