अश्वगंधाचे करा याप्रकारे सेवन आणि रहा आयुष्यभर निरोगी…पण या लोकांनी कधीही करू नये अश्वगंधाचे सेवन…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

आपल्याला माहित असेल की अश्वगंधा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. औषधी गुणधर्मांनी युक्त अश्वगंधा सेवन केल्यास अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. निरोगी राहण्यासाठी, अश्वगंधा आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे, परंतु काही लोकांना अश्वगंधाचे सेवन केल्यास नुकसान सुद्धा होऊ शकते.
आज आम्ही आपल्याला अश्वगंधाचे फायदे सांगणार आहोत आणि कोणत्या लोकांनी अश्वगंधाचे सेवन करू नये हे देखील सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ.
तणाव घालवण्यासाठी:-
आजकाल आपल्याला तणाव येण्याची समस्या तर सर्रास दिसून येते. तणावामुळे लवकर म्हातारपणच येत नाही तर त्यामुळे अनेक आजारालाही आपल्याला सामोरं जावं लागत आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तणाव आणि चिंताग्रस्त जीवनाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक औषध अश्वगंधा हा रामबाण इलाज आहे.
वास्तविक यामध्ये अँटिस्ट्रेस गुण आढळतात. अश्वगंधामध्ये असलेल्या सिटोइंडोसाईड आणि एसाईलस्टरीग्लुकोसाईड्स हे दोन्ही कंपाऊंड शरीरामध्ये अँटिस्ट्रेस गुणाचे काम करतात. यामुळे तणावापासून मुक्ती मिळते.
कोलेस्ट्रॉल:-
अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून आपल्याला वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते.
वर्ल्ड जर्नल ऑफ मेडिकल सायन्सच्या शोधातूनदेखील ही गोष्ट सिद्ध झाली आहे. अश्वगंधामध्ये जास्त प्रमाणात हायपोलिपिडेमिक आढळतं, जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात.
निद्रानाश कमी करण्यासाठी:-
कोणत्याही व्यक्तीला निद्रानाशाची समस्या असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधाचे सेवन करावे. जपानमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार अश्वगंधाच्या पानांमध्ये ट्रायथिलीन ग्लायकोल नावाचे यौगिक असते जे झोप चांगली लागण्यासाठी मदत करते.
या रिसर्चच्या आधारानुसार निद्रानाश असलेल्या व्यक्तींनी अश्वगंधाचे सेवन केल्यास, त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. पण त्याचे किती प्रमाण घ्यायचे आहे ते मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून विचारून घेणं योग्य ठरेल. अश्वगंधा चे फायदे असेही होतात.
अश्वगंधाच्या सेवनाने उंची वाढण्यास आपल्याला मदत होते, अश्वगंधच्या सेवनाने कर्करोग सारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो. याच्या सेवनाने आपले मन शांत राहते, तसेच जे लोक संभोग करताना लवकर थकतात त्याच्या साठी खूप प्रभावशाली औषध आहे.
आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतो, अश्वगंधा मध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स आणि विट्यांमिंसमुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. अश्वगंधा च्या सेवनाने ६९% झोप न येण्याची समस्या आणि ताण तणाव या सारख्या समस्या दूर होतात.
पाचक प्रणाली ठीक राहते:-
अनेक लोक पाचन समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे पाचन तंत्र मजबूत करण्यासाठी आहारात अश्वगंधाचा समावेश करावा. रोज एक ग्लास दुधात एक चमचा अश्वगंध आणि मध मिसळून त्याचे सेवन केल्यास आपले पाचन तंत्र निरोगी राहते. तसेच पाचक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी याप्रकारे या मिश्रणाचे रोज सेवन करावे.
संधिवाताची लक्षणे कमी होतात: प्रभावी दाहशामक असल्याशिवाय, अश्वगंधा संधिवाताचा त्रास आणि सूज कमी करण्यासही उपयोगी आहे. ते पित्तात ही समतोल आणते, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये संधिवाताचे कारण समजले जाते.
या लोकांनी अश्वगंधाचे सेवन टाळले पाहिजे:-
ज्या लोकांना एसिडिटीची समस्या असते:-
आम्लपित्त समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी अश्वगंधाचे सेवन करणे टाळावे. अश्वगंधा सेवन केल्यास आपली अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.
थायरॉईड:-
थायरॉईड रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच अश्वगंधाचे सेवन करावे. थायरॉईड रूग्णांनी अश्वगंधा सेवन केल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
गर्भवती महिला :-
गर्भवती महिलांनी आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी अश्वगंधाचे सेवन टाळले पाहिजे. अश्वगंधाचे सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकते.